राजुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन

सावित्रीबाई पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास लोकसंख्या नियंत्रण जनजागृती पर विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन नुकतेच राजुरी येथे १६ जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आलेले आहे.

या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके तसेच राजुरी गावच्या सरपंच प्रियाताई हाडवळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष बाळासाहेब औटी,मुंबई पोर्ट ट्रस्ट चे निवृत्त अधिकारी बबनराव हाडवळे,ज्ञानदीप पतसंस्थेचे अध्यक्ष गोरक्ष हाडवळे,विशाल ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील औटी,महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दिलीप घंगाळे,माजी अध्यक्ष संदीप औटी,ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, सखाराम गाडेकर,शाकीरभाई चौगुले,गणेश हाडवळे, महेंद्र हाडवळे,पांडू दादा कोरडे,सुरेश औटी,उंचखडक गावचे माजी उपसरपंच दत्तू नाना कणसे,जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे मेडिएटर अशोक भोर,समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.बसवराज हातपक्की, डॉ. संतोष घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी मान्यवर आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे माजी सभापती दिपक औटी म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेले कार्य गावच्या विकासासाठी दिशादर्शक ठरेल.खेडी आणि ग्रामविकासासाठी तरुणांचे योगदान महत्त्वाचे आहे.शिबिरामार्फत होणाऱ्या विधायक उपक्रमांसाठी गाव सर्वतोपरी मदत करेल असे सरपंच प्रिया हाडवळे म्हणाल्या.बबन हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना पाणी वाणी आणि नाणी जपून वापरा तसेच सोशल मीडियाचा मर्यादित वापर करून विद्यार्थी दशेत जीवनाची दशा होऊ न देता योग्य दिशेने वाटचाल करावी असा मोलाचा सल्ला दिला.ग्राहक पंचायत चे बाळासाहेब हाडवळे यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून समृद्ध भारत घडवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

समर्थमध्ये ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन

अन्न नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय,जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत,जुन्नर आणि राष्ट्रीय सेवा योजना समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने ग्राहक संरक्षण कायदा व प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.या कार्यशाळेची सुरुवात अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली.स्वामी विवेकानंद व मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी पर्यावरण समितीचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उंडे,ग्राहक पंचायत जुन्नर तालुक्याचे संघटक शैलेश कुलकर्णी,तालुका संपर्कप्रमुख नंदाराम भोर,तालुका सहसंघटक कौशल्या ताई फापाळे तसेच संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,बीसीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर,राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.दिनेश जाधव,प्रा.भूषण दिघे,प्रा.गौरी भोर,प्रा.अश्विनी खटिंग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदमश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची समर्थ संकुलाला सदिच्छा भेट!!

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे या शैक्षणिक संकुलास बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या व पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ . बसवराज हातपक्की,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. धनंजय उपासनी,क्रीडा संचालक एच पी नरसुडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ.महेश भास्कर,प्रा.रुस्तुम दराडे,बाळकृष्ण झावरे,सकाळ चे वार्ताहर राजेश कणसे आदि मान्यवर उपस्थित होते.

समर्थ शैक्षणिक संकुल तर्फे संकल्प अन्नपूर्णा येथे वयोवृध्द निराधारांना फराळ वाटप

गेल्या सहा वर्षांत सुमारे १ लाख २५ हजार पेक्षा जास्त डब्यांचे वयोवृध्द निराधार यांना मोफत वाटप – मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांची माहिती