समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

*समर्थ संकुलात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन*


समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन लेख स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,प्रा.प्रदीप गाडेकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र आत्मसात करून त्याप्रमाणे जीवनाची मूल्ये आचरणात आणावी असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.
डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की,शिक्षणाविषयी अपार प्रेम,एक थोर समाजसुधारक,ज्योतिबांच्या सहचारिणी,एक उत्तम गृहिणी,कवयित्री,लेखिका,वक्तृत्व व भाषण कला अशा प्रकारचे सर्वगुणसंपन्न आणि अष्टपैलू महिला व्यक्तिमत्व म्हणून सावित्रीबाईंकडे पाहिले जाते.ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला.पुढे मात्र सावित्रीबाईना,ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.त्या काळात महिलेला चूल आणि मूल,उंबरठा हीच लक्ष्मण रेषा किंवा मर्यादा अशी परिस्थिती होती.मुलगी जर शिकली नाही तर प्रगती होणार नाही व काळाची पावले ओळखून स्त्री सक्षम व सबळ होण्यासाठी पुण्यात सर्वप्रथम १४ जानेवारी १९४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरू केली.आज पुणे विद्यापीठाने देखील सावित्रीबाईंचे कर्तृत्व आणि शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करत विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.चेतन डोखे यांनी मानले.

Leave a Reply